महाराष्ट्रातील बातम्या
तंत्रज्ञान
क्रीडा
जाधववाडी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
प्राथमिक शाळांचे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवते – संतोष नलावडे

(फोटो :- जाधववाडी (ता. पुरंदर ) येथे नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची ढोल, ताशाच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आलेली मिरवणूक)
पुरंदर प्रतिनिधीदि.18:
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षण आता खाजगी शाळांच्या तुलनेत अतिशय दर्जेदार आणि प्रगत झाले आहे. अनेक शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, स्मार्ट टीव्ही, आणि प्रोजेक्टर्सद्वारे आधुनिक शिक्षण दिले जाते.स्थानिक गावांचा आणि पालकांचा सहभाग वाढल्यामुळे तसेच शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक शाळांनी जागतिक पातळीवर नाव कमावले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवते, असे मत जिल्हा परिषद बांधकाम विभाग शाखा अभियंता संतोष नलावडे यांनी व्यक्त केले.
दिवे केंद्रातील जाधववाडी (ता. पुरंदर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा १५ जून पासून प्रारंभ करण्यात आला. शाळा भेट प्रसंगी श्री. नलावडे बोलत होते.
यावेळी दिवे ग्रामपंचायत सदस्या भारती आढाळगे, निलेश जाधवराव, ग्रामपंचायत अधिकारी काशीपती सुतार, निखिल आढाळगे, ज्ञानेश्वर मात्रे, अविनाश दिवेकर, आशिष दिवेकर, गणेश आढाळगे, रमेश आढाळगे, मारुती शेंडगे, विष्णू लव्हाळे, मुख्याध्यापक सुनील लोणकर, सहशिक्षिका सुरेखा लोणकर, मदतनीस अक्षदा आढाळगे आदीसह जाधववाडीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, गोड पदार्थांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
जाधववाडी शाळेत गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या इयत्ता पहिलीतील मुलांचे कुंकवाच्या ताटात पाऊल बुडवून कागदावर ठसे उमटवून पहिले पाऊल , मुलांसाठी सेल्फी पॉईंट, मजेदार झोका हे उपक्रम राबविण्यात आले.
प्रगतशील शेतकरी कै. छबनबापू जाधवराव यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव उद्योजक ऋषिकेश जाधवराव, श्रीकांत जाधवराव, दिपाली देशमुख -जाधवराव यांनी सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील लोणकर यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा लोणकर यांनी केले. आभार अक्षदा आढाळगे यांनी मानले.
राजकीय
भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब इटकर यांची निवड

🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१७:
भारतीय जनता पार्टीचे सासवड येथील निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब इटकर यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या हस्ते बाळासाहेब इटकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
बाळासाहेब इटकर सध्या “वडार कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया” या राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षांमध्ये जबाबदारी सांभाळलेली आहे. भटके विमुक्त समाजाबद्दल त्यांच्याकडे सखोल अभ्यास आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना ही जबाबदारी पुन्हा एकदा दिलेली आहे. भटक्या विमुक्त समाजातील लोकांकरता तांडा सुधार प्रकल्पांतर्गत स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याचा व प्रत्येक भटक्या समाजातील लोकांना ओळखपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गिरीशआप्पा जगताप, जेजुरी देवसंस्थान समितीचे अध्यक्ष ॲड. विश्वास पानसे, सासवड मंडल अध्यक्ष आनंद भैय्या जगताप, सरचिटणीस उदयनराज जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनकाका भैरवकर, वीरेश दहिवले भगवान पवार आदी मान्यवरांनी बाळासाहेब इटकर यांची भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
News Carousel
Latest News
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.24:आषाढी एकादशीचे औचित्य साधून मानसी सामाजिक संस्था व एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला विद्यार्थी, पालक…
आनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले
◾ठाणे प्रतिनिधी◾ दि.२५जुलै,२०२६: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय आणि ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले.…
नवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
८ लाख १३ हजार किमतीचे ५० मोबाईल मिळवण्यात पोलिसांना यश 🔳 नवी मुंबई प्रतिनिधी 🔳 १५जुलै, २०२६ :(महादेव दौंड): कामोठे पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले जवळपास…
आळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहिती
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सासवड मुक्कामी उपक्रमथॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम यांची माहिती 🔳 पुरंदर प्रतिनिधी 🔳 दि.१४, जुलै ,२०२६: पुरंदर तालुक्यातील सासवड मुक्कामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा…
सोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस
🔳 सोलापूर प्रतिनिधी 🔳 दि.१३जुलै, २०२६: सोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने सदरचे गुन्हे उघउकीस आणणेबाबत श्री. एम. राज कुमार पोलीस आयुक्त, डॉ.अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.),…




