ताज्या बातम्या
एस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीसजेजुरी-बेलसर जवळ अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूमुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र गांगण रिंगणात; मंत्रालय पत्रकारांकडून विजयाच्या शुभेच्छारेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजIssue 3-YR14- 3 – 9 July-26 Mahasangharsh Newsमुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील प्रमुख रस्ते जलमय आणि दरडींच्या विळख्यात; वाहतुकीचा खोळंबाआ. विक्रांत पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरासिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत केली गोवा बनावटीची दारू जप्तसिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईप्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना एम्ब्युलन्सची सुविधा द्यावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हेझाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’ चा गुन्हा दाखल करा; सुराज्य अभियानाची मागणी

🔳 मुंबई प्रतिनिधी 🔳 दि.30 जून : (सुरेश गायकवाड):

 महाराष्ट्र राज्यात जवळजवळ ५ लाखाअधिक शासकीय ठेकेदार कार्यरत असून गेली २-३ वर्षांपासून त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही.त्यांच्या कामाची जवळजवळ ९० हजार कोटीच्या बिलाच्या रक्कमा सरकारकडे पडून आहे.अशावेळेस सरकार देश अडचणीत आहे असे सांगते.आणि अशी खरोखर परिस्थिती असेल तर सरकारने तसे जाहीर आवाहन करावे.जेणेकरून देशासाठी ९० हजार कोटी रुपये समर्पित करण्यात आम्ही मागेपुढे पाहणार नाही.कारण देश असेल तर आपण असू असे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या पदाधिकार्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

 यावेळेस फेडरेशनच्या पदाधिकार्यांनी सांगितले की,यापूर्वी सरकारकडे असलेली बिले पडून न राहता लवकर मंजूर होत होती. पण,सध्या २/३ वर्षांपासून बिले पडून आहे. ज्यामुळे ठेकेदारांना त्याचा खूपच त्रास सहन करावा लागत.त्यात काही ठेकेदारांना आपला जीव गमवावा लागला.ही सध्याची परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ठेकेदारांचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्य उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते होऊ नये यासाठी राज्यातील सर्व संघटना एकत्र येऊन फेडरेशनची स्थापना करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. त्यात फेडरेशनच्या अध्यक्षपदी बापू लाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून लवकरच कार्यरकारणी जाहीर करण्यात येईल.आणि फेडरेशनच्या कामाची दिशा ठरवता येईल. जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने,मोर्चा काढून अन्यायाविरोधात आवाज दिला जाईल. 
 
एवढेच नव्हे तर सरकारने पावसाळी अधिवेशनात आमच्या कामाची बिले मंजूर करून आमच्या कामाचा मोबदला दिला नाही तर यापुढें उग्र आंदोलन छेडण्यात येईल.त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री,अधिकारी यांच्या निवासस्थानी घेराव,लोटांगण, पुतळे जाळणे आदी विविध प्रकाराची आंदोलने करण्यात येईल. आणि सरकारला छोटे,मोठा असा ठेकेदारांमध्ये भेद न करता सर्वाना कामे मिळण्यासाठी लक्ष वेधले जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
error: Content is protected !!