निरीक्षक प्रकाश यादव तसेच महामार्ग देवदूत टीम सहकाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

🔳 पुणे प्रतिनिधी 🔳 दि. 06 जुलै 2026:
सोमवार, दि. 06 जुलै, रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांसारखे पाणी वाहू लागल्याने सोबत दगड, धोंडे, माती, चिखल, पाणी यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अनेक वाहनचालक व प्रवासी अडचणीत सापडले होते. वाहने अडकली परिणामी वाहतूक विस्कळीत झाली होती.
तात्काळ उपलब्ध जे.सी.बी. च्या साह्याने रस्त्यामधील माती, दगड चिखल बाजूला करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले.
अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महामार्ग आपत्कालीन व्यवस्थापन टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना व वाहनचालकांना आवश्यक ती मदत केली. पाण्याचा प्रवाह, वाहतूक कोंडी आणि सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस याची पर्वा न करता टीमने दिवसभर कर्तव्य बजावत अनेक वाहनांना सुरक्षित मार्ग काढून दिला, तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या आपत्कालीन कार्यात आय.आर.बी. चे प्रकाश यादव, नवनाथ टिळे, विलास म्हस्के व त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवलेले धैर्य, तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि सार्वजनिक सेवाभाव विशेष उल्लेखनीय असून, त्यांच्या या कार्याचे प्रवासी, नागरिक तसेच विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत निःस्वार्थपणे बजावलेली ही सेवा निश्चितच प्रेरणादायी आणि प्रशंसनीय ठरत आहे.
