ताज्या बातम्या
बीआयएस (BIS) स्टॅंडर्ड क्लबची ‘स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन’ व पहिली ॲक्टिव्हिटीपिंपळे विद्यालयात स्व. ना. अजित दादा पवार यांची जयंती साजरीजय मल्हार क्रांती संघटनेच्या पुरंदर तालुका युवक अध्यक्षपदी सुनील गोफणे यांची निवडबाबाराजे जाधवराव लोकाभिमुख नेतृत्व – सौ. संगिता काळेइस्रो नासाच्या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी वेदांतची निवडएसआयआर मोहिमेत भायखळ्याचा राज्यातील महानगरांत प्रथम क्रमांकअतिवृष्टीत प्रवाशांच्या मदतीला धावली महामार्ग आय.आर.बी. कपंनी आपत्कालीन व्यवस्थापन टीमशिक्षक सेवा पूर्तीची 30 वर्षे पूर्णवृत्तपत्रांवर बचतीची कात्री; सरकारच्या निर्णयावर पत्रकार परिषदेचा तीव्र आक्षेपवाघापूर येथे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणएस नॅपकिन बुके’ज सत्कार हाऊस तर्फे आयोजित “सखा पांडुरंग” ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादआनंद विश्व गुरुकुलच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेनवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरीआळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहितीसोलापूर शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

निरीक्षक प्रकाश यादव तसेच महामार्ग देवदूत टीम सहकाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

🔳 पुणे प्रतिनिधी 🔳 दि. 06 जुलै 2026:

सोमवार, दि. 06 जुलै, रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांसारखे पाणी वाहू लागल्याने सोबत दगड, धोंडे, माती, चिखल, पाणी यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अनेक वाहनचालक व प्रवासी अडचणीत सापडले होते. वाहने अडकली परिणामी वाहतूक विस्कळीत झाली होती.
तात्काळ उपलब्ध जे.सी.बी. च्या साह्याने रस्त्यामधील माती, दगड चिखल बाजूला करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले.
अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महामार्ग आपत्कालीन व्यवस्थापन टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना व वाहनचालकांना आवश्यक ती मदत केली. पाण्याचा प्रवाह, वाहतूक कोंडी आणि सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस याची पर्वा न करता टीमने दिवसभर कर्तव्य बजावत अनेक वाहनांना सुरक्षित मार्ग काढून दिला, तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या आपत्कालीन कार्यात आय.आर.बी. चे प्रकाश यादव, नवनाथ टिळे, विलास म्हस्के व त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवलेले धैर्य, तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि सार्वजनिक सेवाभाव विशेष उल्लेखनीय असून, त्यांच्या या कार्याचे प्रवासी, नागरिक तसेच विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत निःस्वार्थपणे बजावलेली ही सेवा निश्चितच प्रेरणादायी आणि प्रशंसनीय ठरत आहे.

error: Content is protected !!